स्वतः संकताट असताना इराण भारताच्या मदतीला, होर्मुझ समुद्र धुनी बाबत मोठी बातमी, भारताला कसलाच टोल नाही
India Iran Relation : होर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या जहाजांची चिंता वाढली आहे. अशातच आता या संकटाच्या काळात इराण भारताच्या मदतीला धावला आहे. इराणने एक मोठी घोषणा केली आहे.
स्वतःवर संकट असतानाही इराण भारताच्या मदतीला, होर्मुझबाबत मोठी घोषणा, भारतावरील संकट टळणार
इराण आणि अमेरिकेतील तणाव आणखी वाढला आहे, त्यामुळे होर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या जहाजांची चिंता वाढली आहे. अशातच आता या संकटाच्या काळात इराण भारताच्या मदतीला धावला आहे. इराणने स्पष्ट केले आहे की, होर्मुज सामुद्रधुनी मधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल आकारलेला नाही. पुढे इराणने आगामी काळात भारताला मदत करण्याची घोषणा केली आहे. भारतातील इराणचे राजदूत मोहम्मद फतहली यांनी सांगितले की, ‘तुम्ही भारत सरकारला विचारू शकता, आम्ही आतापर्यंत कोणताही टोल घेतलेला नाही.’ पुढे बोलताना त्यांनी म्हटले की, या कठीण काळात भारत आणि इराण यांचे संबंध मजबूत आहेत आणि दोन्ही देशांचे हितसंबंध समान आहेत.
Tags
India Iran Relation